पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका.

इमेज
   वंजारी समाज बांधवांनो दलितांच्या वाटेने जाऊ नका!   पंकजा ताई मुंढे यांच्यावर सध्या जे बिनबूडाचे आरोप होत आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या पेड न्यूज चालवल्या जात आहेत हे पाहून आम्हाला पुन्हा एकदा एक वैचारिक व राजकिय पुनरावृत्ती होते की काय अशे वाटते.  ज्यांना मुंढे साहेबांनी मोठं केल तेच लोक आता ताई साहेबांच्या विरोधात कटकारस्थान रचत आहेत,यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. नाहीतर तुमची गत दलित बांधवांसारखी होईल.भारतरत्न डॉ.आंबेडकरांसारखे नेतृत्व लाभले असतानाही सध्या दलित नेत्यांची आवस्था ना घर का न घाट का अशी झाली आहे.दलित समाज गटातटात विभागला गेलाय.देशाचे नेतृत्व करण्याची ताकत असतानाही दलित नेत्यांना आता कवडीमोल किंमत राहिली नाही.कॉग्रेस ,राष्ट्रवादीने आणि भाजपाने फोडा आणि राज्य करा  या धोरणामुळे दलित समाज एकसंघ राहिला नाही.आनेक नेते आपली चूल मांडून बसले आहेत़ परंतू समाजाची ताकत विखुरली गेली यामुळे राजकिय फायदा इतरांनाच होत आहे.सत्तेसाठी आता दलितांना सत्ताधारी पक्षांचे उंबरठे झिजावे लागत आहेत.बाबासाहेबांची शिकवन त्यांनी बासनात गुंडाळून ठेवली आहे.देशात दलित समाज खुप मोठ्या संख्येने  आह