पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणांनो आपले मत विकू नका!

इमेज
    मतदारांनो आपले मतं विकू नका!     ग्रामपंचायतिच्या निवडणुका जाहिर झाल्या तशे ग्रामिण भागातिल वातावरण तापू लागले आहे.पारावर,चावडीवर व चौकाचौकात गप्पांचे फड रंगु लागले आहेत.'गावचा सरपंच कोण होणार? आमदार -खासदारकिच्या निडणूकिपेक्षाही ग्रामपंचायतिच्या निवडणुकिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.गावा गावात निडणुकिचा जोर शिगेला पोहचला आहे.याला कारण म्हणजे या वर्षिच्या ग्रामपंचायतिच्या निवडणुक खऱ्या अर्थाने वेगळ्या आहेत.एक तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होणार आहे आणि गावातिल जनतेचा कौल कोणत्या नेत्याच्या व पार्टीच्या बाजूने आहे हे समजणार आहे. ग्रामपंचायतिला सक्षम करण्यासाठी व ग्रामिण भागाचा विकास करण्यासाठी  करोडो रुपये अनुदान मिळणार आहे.यामुळे गावाचा कारभारी आपण व्हावे यासाठी गावातल्या पुढाऱ्यांनी चंग बांधला आहे.हौसे नवसे गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत. सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतुन होणार असल्यामुळे गावातिल जनता कोणाच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार आहे.यामुळे कधि नव्हे येव्हढे महत्व  यावर्षि निवडणुकिला  प्राप्त झाले आहे.          गावातिल जनता आपल्याच बाजूने आहे' हे द

आगरी व्हर्जन-- आमलावं पायजे मोबाईल ! (सुर्यकांत सराफ यांच्या आम्हांलाही हवाय मोबाईल.इ.४थी च्या बालभारती पुस्तकातील नाट्यछटेचे आगरी व्हर्जन.)

इमेज
                          आमलावं पायजे मोबाईल !        माझ एकदा आयकतय का, आई? मी आथां मोठी झालय अस तु निका सांगतय? मग मानाव सगल्यान सारका एक मस्त मोबाईल पायजे का नी.क्याचे साठी पायजे म्हनजे काय? बोलायसाटी ना हाय फोन?वा गंमत हाय,ताईन मांगला का लगेच मिलतय फोन दादा त कॉलेजलाव नेतय त्याचा मोबाईल.      बाबाचे जवल त दोन दोन मोबाईल हान,ना मीन मांगल्यावर तू सांगतस तुला काय गरज हाय त्याची.ओय ताई,नुसती काय पन बोलू नको,तुला मोबाईल दिलात तवा मी काय बोललू का? हॉं हॉं आमाना महत्वाची कामा व आसतान,महत्वाच बोलायचा असतय.दादाचा फोन  मी घेताव कवा कवा.पन फक्त गेम खेलाय,बोलय काय करु मंग?         आई पुढचे मयनेन माझा वाढदिवस येतय,माझे मिञांना मैञिनींना पार्टीला बोलवया कवरी मजा येल! 'अरं उंद्या सांचे माझे घरा गच्चीवर बड्डे पार्टी हाय.तु जरा लवकर येल ना?मस्त,भारी,आपू जाम मजा करु!आथा सगल्यांना फोनवर सांगता,बाय'. वा कवडा बरां वाटल असा फोन करताना.आई, अगं शालेन अचानक सुट्टी घेयाची असली का,नसती सरांची बोलनी खाया लागतन.त्यापेक्षा पप्पा कसं घरशास फोन करतान,तसा सरांना शालेन फोन करायचा. 'हँलो! गूड मॉर्नीं

FIVE LITTLE SENSES

इमेज
Poem---- Five Little SENSES       Wonderful nature       and around the sky's       allow us to see       two beautiful EYES Breath for life and used to smell one little NOSE you know very well       Distinguish sounds      and allow us to hear      don't put anything       in sensitive EAR Help to talk and sense of flavour I am a TONGUE control me ever      Sense of touch      and organ of regulation      SKIN protect body      and function of excretion Five little SENSES are parts of body TEACH us everything keep it clean and tidy Poet--Datta Dhakane-Bavikar mo.no.9867062398 poetddl.blogspot.com

'सेल्फीस' संघटना!

इमेज
'सेल्फीस' संघटना! तालुक्याच्या बाहेर जाण्याची  दहशत वाटते? थोडस जिल्ह्याबाहेरही काम करुन पहा ? *आणि जमलचं तर डिसीपिएसला विरोध करा! -- दत्ता ढाकणे-बावीकर     २७/०२/२०१७ रोजी शासनाने जिल्हांतर्गत बदल्यांचे नविन धोरण जाहीर केले आणि हजारो शिक्षकांचे धाबे दणाणले. प्रस्थापित शिक्षक संघटनानी सवयी प्रमाणे विरोध सुरु केला.आवघड आणि सोप्याचा वाद सुरु झाला.सोप्या सुविधा युक्त शाळेत  चिकटून  बसलेल्या आमच्या बांधवांना वस्ती उठण्याच्या भितीने घाम फुटला.आपली शाळा आवघड क्षेञात यावी यासाठी आनेकांनी वरिष्ठ पातळीवर वशिलेबाजी सुरु केली आहे.आता तर आवघड क्षेञात काम करऩारे शिक्षक सोप्या  क्षेञात काम करणाऱ्या शिक्षक बांधवांना हाड वैरी वाटू लागलेत. स्व:च्या तालुक्यात (होम ब्लॉकमधे) काम करणाऱ्या शिक्षकांचा तर बीपी खालीवर होऊ लागला. पानपट्टीवर, हॉटेलात , शाळेत, केंद्रात, ट्रेन मध्ये एकच चर्चा "कसं हो सर? मला दहा वर्षे झालीत. मी जातोय काय तालुक्याबाहेर",मी उडतोय काय?. आहो गुरूजी तुम्हाला तुमच्याच जिल्ह्यात इतर तालुक्यात जाण्याची व तेथे गेल्यावर होणार्या असुविधेची एवढी काळजी वाटते तर स्वत:च्या ज

Writers View! ...पञकार स्वस्थ बसू देत नाही!

इमेज
Writers View!मनमोकळ! ....पञकार स्वस्थ बसू देत नाही.     शिक्षकी पेशात असुनही समाजातिल विदारक, अन्यायकारी,चिड आणणाऱ्या गोष्टी पाहून माझे मनं मला स्वस्थ बसू देत नाही. विद्यार्थांना ज्ञानदानाचा वसा तर घेतलाच आहे परंतु समाज्यात  सामाजिक,राजकिय व शैक्षणिक जागृती करण्यासाठी खारिचा वाटा उचलावा यासाठी मागिल आनेक वर्षा पासुन मी लेखणी झिजवित आहे.तसा बालपणापासुनच परखडपणा,आन्याविरोधात चिड आणि हळवेपणा यामुळे कविता लिहीण्याचा छंद लागला.कोणिही गुरु नाही किंवा,कवितेचा वारसा नाही.मला परिस्थितीने कवि बनविले.जे मनाला भावले ते कागदावर उतरविले.समाज्यात घडलेल्या घटना माझ्या हळव्या मनावर घाव घालत होत्या आणि मी लिहीत होतो.गावचा परिसर,शेती,नाते संबंध,माणसांच्या निरनिराळ्या तऱ्हा यावर आनेक कविता लिहील्या.आगदी नववित शिकत असताना बिड आकाशवानिवर कविता वाचनाचे दोन कार्यक्रम झाले.त्या काळात मला दिड हजार रुपये मिळाले होते. ते माझ्यासाठी खुप मोठे होते.आणि तेव्हापासुन लोक मला कवि म्हणायला लागले.तो पर्येंत मी कवि आहे हेच मला माहित नव्हते. अधून मधून मी कथाही लिहायला लागलो.एकदा माझ्या आईचे व भावाचे भांडण लिहून काढले.आणि त

मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा-शिक्षक

इमेज
*मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा - शिक्षक* मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून अर्ज केला होता. मला ती नोकरी मिळाली नाही. नंतर आयुष्याला वेगळं वळण मिळालं व ती महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली. पुढं आयुष्यात अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या व अनेक प्रकारच्या संधी हातातून निसटल्यासुद्धा; पण मला भूतानमधली ती शिक्षकाची नोकरी न मिळाल्याची हुरहूर एकसारखी वाटते. कधी कधी अजूनही शिक्षक व्हावंसं वाटतं मला. स्वीडन व डेन्मार्क या दोन देशांच्या सीमेवर; पण स्वीडनच्या हद्दीत लुंड विद्यापीठ आहे. गेल्या ५०० वर्षांपासून ते आजतागायत हे विद्यापीठ ज्ञानप्रसाराचं काम करतं. मात्र, ते काळानुसार बदलतं. सध्या तिथं २१ व्या शतकाशी सुसंगत अशा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानावर भर आहे. विद्यापीठाच्या परिसरात अमेरिकेतल्या ‘सिलिकॉन व्हॅली’सारखाच ‘स्कॉने कौंटी’ हा विभाग नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेनं गजबजलेला आहे. या विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य व विश्‍लेषण करणारं एक नियतकालिक निघतं. त्याचा दर्जा ‘टाइम’, इकॉनॉमिस्ट’ अशा स