मी तिरंगा बोलतोय..... झेंडा उँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा... असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तुमचा तिरंगा, राष्ट्रध्वज आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. सर्व भारतीय माझा आदर करतात. बाल मिञांनो! या वर्षी आपण स्वातंञ्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.देशात स्वातंत्र्याचा उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. लहान- थोर सर्वांच्या मी मना-मनात आहेच परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 'हर घर तिरंगा' हे अभियान सुरु केल्यामुळे आता मी प्रत्येक भारतीयांच्या घरा घरात पोहचलो आहे. यामुळे मी अतिशय आनंदात आहे. बाल मिञांनो!माझी डिझाइन पिंगली वैंकया यांनी तयार केली आणि 22 जुलै 1947 रोजी पार पडलेल्या संविधान सभेत मला मान्यता देण्यात आली. त्याग , शांतता आणि समृद्धी चे प्रतिक असणारे तीन रंग व त्यावर मधोमध शोभणारे अशोक चक्र यामुळे मी दिमाखदार दिसतो आणि तसा
ॲ क्सिडेंटल हॉलिडेज...! - दत्ता ढाकणे-बावीकर सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत. मी आत्ताच झोपेतून उठलोय आणि नेहमीप्रमाणे माझ्या घराच्या गॅलरी बसलोय.आज मला समोरचे चिञ निराळे दिसत आहे. रोज पहाटे चार वाजता उघडणारे आमच्या सोसायटीचे गेट आज सात वाजत आले आहेत तरी बंदच आहे. कोंबडा हरवण्याचा आवाज येतोय लोक्स अजूनही साखर झोपेतच असावेत कदाचित. निरव परंतु भितीदायक शांतता जाणवत आहे. वातावरणात जरासा गारवा आहे. तरिही दररोज जॉगींग करणारे लोक्स नाहीत, दूर दूर कुठेच माणसं दिसत नाहीत. अजिबात गोंगाट नाही लेकरांचा रडण्याचा हे आवाज नाही . ज्याप्रमाणे पूर्वी कडक शिस्तीचे गुरुजी वर्गात छडी घेऊन येताना दिसल्यावर जसा वर्ग चिडीचूप होत असे तसा समोरचा परिसर चिडीचूप वाटत आहे. आज दूधवाला दिसत नाही, पेपर वाल्याच्या सायकलचा ट्रिंग ट्रिंग आवाजही येत नाही. आज रविवार खवय्यांचा खास दिवस असूनही ' मावरं घे ग, ताई मावरं पाहिजे का ग!' असा आवाज ऐकायला येत नाही. गाड्यांची तर अजिबातच वर्दळ नाही साधी मोटर सायकल रस्त्यावर धावताना दिसत नाही, धडधडणाऱ्या लोकल गाड्यांचा
डेमॉस्थेनिस ...! बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत. आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा