डेमॉस्थेनिस ...! बोलणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. काही माणसे इतके सुंदर बोलतात की समोरच्या माणसाला बघता बघता खिशात टाकतात. काही आपल्या मनातील इप्सित समोरच्याला पटवून देतात, काही समोरच्यांवर इतके गारुड घालतात की समोरची व्यक्ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होते. ही देणगी आहे उत्तम वक्तृत्वाची.प्राचीन काळीही राजे महाराजे आपल्या सैन्याला युद्धासाठी भाषणातूनच चैतवायचे. अलेक्झांडरचे सैन्य जग जिंकायला निघाले ते त्याने केलेल्या उत्तम वक्तृत्वामुळेच. छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेताना आपल्या सवंगड्यांना आपल्या प्रभावी वाणीनेच स्वराज्याचे स्फुरण चढविले होते. आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये सेनापतीने आपल्या सैन्याला उत्तेजित केल्यामुळेच ती युद्धे जिंकली गेल्याचे उल्लेख आहेत. आधुनिक काळात उत्तम वक्त्याचे हे गुण राजकारणात लोकांना आकर्षति करण्यासाठी उपयोगी पडतात. मार्टनि ल्युथर किंग यांचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण, हिटलर, लेनिन आणि बोल्व्हेशिक क्रांतीतील भाषणे ते स्वामी विवेकानंद यांचे धर्म परिषदेतील अजरामर भाषण हे वक्तृत्व कलेचीच देणगी.भारतीय स्वातंत्र्य ...
NPS योजनेला मुदतवाढ बीड दि.10, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक, तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्द्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लागू असलेली DCPS योजना केंद्राच्या NPS योजनेत सामाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदतवाढ शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. 19/09/2019 च्या कार्यपद्धती शासन आदेशाला देण्यात आलेली ही लगातार 5 वी मुदतवाढ आहे. या मुदतवाढी देताना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देण्यात आलेली आहेत. आजची मुदतवाढ देताना "तांत्रिक अडचण व कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अंमलबजावणी साठी विलंब होत असल्याचे" कारण देण्यात आले आहे. परंतु NPS ची अंमलबजावणी प्रक्रिया थांबवण्याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली परखड भूमिका हेच आहे. शिक्षक संवर्गाला 15 वर्षे लागू असलेल्या DCPS योजनेचा पोस्टमार्टेम केले असून, नवीन NPS ची वस्तुनिष्ठ पोलखोल केलेली आहे.रा...
भगवान गडावर दसरा मेळावा! एक सामाजिक व वैचारीक गरज! --दत्ता ढाकणे-बावीकर मागील काही दिवसांपासून भगवान गडावरील दसरा मेळाव्या विषयी ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत त्या ऐकुन सामान्य माणसांच्या मनाला वेदना होत आहेत.दसरा मेळावा होणार की नाही?पंकजा ताई गडावर येतिल की नाही? ताईंचे भाषण होईल कि नाही? दसरा मेळाव्याला विरोध कुणाचा? की या फक्त आफवा आहेत?अशे आनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मागिल ताळीस वर्षापासुन दसरा मेळावा आणि स्व.गोपिनाथ मुंढे साहेबांचे आतूट नाते होते.संत भगवान बाबांच्या आशिर्वादाने मुंढे साहेबांनी सामान्य,गोरगरिब,बहुजन समाज्याच्या कल्यानाचे स्वप्न पाहीले व सत्ता त्यांच्या पायाशि आणून ठेवली.सध्याची तरुण पिढी त्यांचे विचार ऐकत ऐकत मोठी झाली.मुंढे साहेबांनी आपल्या नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याने लोकांना राजकिय व सामाजिक संस्कार दिला.ज्या प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्याच प्रमाणे भगवान गडावरिल दसरा मेळाव्याची परंपरा.बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा